संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » नांदेड » नांदेड जिल्ह्यात 122 रास्तभाव दुकानांच्या परवान्यांसाठी अर्ज भरण्यास 12 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

 





• *आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत* 


नांदेड, दि. २५ जुलै : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या व पर्यायी व्यवस्थेत असलेल्या 122 रास्तभाव दुकानांच्या जागांवर नवीन परवान्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत बुधवार 12 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच प्राप्त अर्जांवर आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठीही मुदत शुक्रवार 31 जुलै 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

शासन निर्णय 6 जुलै 2017 व 2 फेब्रुवारी 2022 मधील तरतुदींनुसार विविध कारणांमुळे (परवाना रद्द होणे, राजीनामा, मृत्यू, वैद्यकीय रजा आदी) रिक्त झालेल्या आणि सध्या पर्यायी व्यवस्थेत सुरू असलेल्या 122 रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता राहावी व सर्व पात्र संस्थांना पुरेशी संधी मिळावी या कारणास्‍तव अर्ज करण्‍याकरिता पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.  

या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राहावी आणि सर्व पात्र संस्थांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी नवीन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच सदर जाहिरातीबाबत प्राप्त अर्जांवर आक्षेप किंवा हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.

इच्छुक पात्र स्थानिक संस्थांनी, ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिला बचत गट आदींनी संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून मुदतवाढीच्या कालावधीत अर्ज किंवा आक्षेप सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply